MPSC सराव प्रश्नपत्रिका - इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास


MPSC सराव प्रश्नपत्रिका - इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास 


                या पोस्ट मध्ये MPSC परिक्षेच्या इतिहास या विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिक वर आधारीत एक MCQ टेस्ट दिलेली आहे. या टेस्ट मध्ये एकूण 50 प्रश्न दिलेली आहेत जी सोडवल्यावर विद्यार्थ्यांना लगेच त्याचे मूल्याँकन करून दिले जाईल. ही टेस्ट एकूण 50 मार्क्सची आहे. जी सोड़वायला 90 मिनिटांची वेळ देण्यात आलेली आहे. या टेस्ट चा आरखड़ा आणि त्यात विचारली गेलेली प्रश्न खाली देण्यात आलेली आहेत. ही टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या शेवटच्या सेक्शन मध्ये जाऊन ही टेस्ट द्यावी लागेल. टेस्ट सोड़वण्याआधी विदयार्थ्याने आपले पूर्ण नाव लिहिणे अनिवार्य आहे त्या शिवाय टेस्ट सोडवता येणार नाही तसेच प्रत्येक प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे.   

MPSC सराव प्रश्नपत्रिका - इतिहास - आधुनिक भारताचा इतिहास



विषय: आधुनिक भारताचा इतिहास (Modern Indian History) 

एकूण प्रश्न: 50 

एकूण गुण: 50 

वेळ: 90 मिनिटे


सूचना :

  1. विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव लिहावे.

  2. सर्व प्रश्न MCQ टाईप चे आहेत. 

  3. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे.  

  4. या टेस्ट साठी निगेटीव्ह मार्किंग सिस्टीम लावलेली नाहीये. 

  5. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडावा.  

  6. टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 

  7. टेस्ट सुरू होण्याआधी तुम्हाला तुमच्या Google Account ने Sign In करायला विचारले जाऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने आपल्या किंवा आपल्या आई वडिलांच्या Google Account ने Sign In करावे. 

  8. टेस्ट देण्यासाठी या पोस्ट च्या सर्वात शेवटी जावे आणि स्क्रॉल करून Student Name च्या खाली Your Answer वर क्लिक करून आपले नाव लिहावे.

  9. टेस्ट Submit झाल्यावर विद्यार्थ्यांनी View Score या बटनावर क्लिक करून आपले मार्क्स चेक करून घ्यावे. 

  10. या टेस्ट मध्ये विचारली गेलेली प्रश्न खालील प्रमाणे आहेत. 


1) तुर्कांनी रोमन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टिनोपल कोणत्या वर्षी जिंकून घेतले ? 

A) 1498

B) 1453

C) 1488

D) 1510


2) युरोपीय देशांना पूर्वेकडील देशांकडे जाणारा नवीन सागरी मार्ग शोधणे का अपरिहार्य बनले ? 

A) खुष्कीचे व्यापारी मार्ग बंद झाल्यामुळे

B) सोने व हस्तीदंताचा व्यापार वाढल्यामुळे

C) पोर्तुगालने युद्ध पुकारल्यामुळे

D) यांपैकी नाही


3) सागरी मार्ग शोधण्याच्या मोहिमेत कोणते देश आघाडीवर होते ? 

A) इंग्लंड आणि फ्रान्स

B) स्पेन आणि पोर्तुगाल

C) डच आणि डॅनिश

D) इटली आणि जर्मनी


अजून वाचून पहा : 6 वी नवोदय : अंकगणित - पूर्ण संख्यांवरील चार मुलभूत क्रिया - स्वाध्याय 2.1 


4) नव्या सागरी शोधांमुळे आफ्रिकेतून प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला ? 

A) तंबाखू आणि मसाले

B) सोने, हस्तीदंत आणि गुलाम 

C) कापूस आणि रेशीम

D) प्रिंटिंग प्रेस आणि जहाजे


5) 1488 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टोकापर्यंत पोहोचणाऱ्या बार्थोलोम्यू डायसने त्या टोकाला काय नाव दिले ? 

A) केप ऑफ गूड होप

B) कालिकत

C) अमेरिका

D) वेस्ट इंडिज


6) स्पेनचा खलाशी कोलंबस हा 1492 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोणत्या दिशेने निघाला होता ? 

A) पूर्वेकडून

B) पश्चिमेकडून

C) दक्षिणेकडून

D) उत्तरेकडून


7) कोलंबसने शोधलेला प्रदेश हा भारताचा किनारा नसून नवीन प्रदेश आहे, हे 1495 मध्ये कोणी स्पष्ट केले? 

A) वास्को-द-गामा

B) अमेरिगो व्हेस्पुसी 

C) बार्थोलोम्यू डायस

D) फर्डिनांड मॅगेलन


8) वास्को-द-गामा हा अब्दुल मनीक याच्या सहाय्याने किती दिवसांचा प्रवास करून भारताच्या किनाऱ्यावर पोहोचला? 

A) 60 दिवस

B) 90 दिवस 

C) 30 दिवस

D) 120 दिवस


9) वास्को-द-गामा 1498 मध्ये भारतामध्ये कोणत्या राजाच्या दरबारात पोहोचला? 

A) राजा आदिलशहा

B) राजा झामोरीन 

C) शहा आलम

D) बादशहा जहांगीर


10) 1519-1524 दरम्यान पृथ्वी प्रदक्षिणेचा उद्देश ठेवून प्रवास करताना कोणत्या पोर्तुगीज खलाशाचा फिलिपाइन्समध्ये मृत्यू झाला? 

A) बार्थोलोम्यू डायस

B) फर्डिनांड मॅगेलन 

C) कोलंबस

D) डुप्ले


11) भारतात येणाऱ्या युरोपियन सत्तांमध्ये सर्वात पहिले कोण आले होते? 

A) डच

B) पोर्तुगीज 

C) इंग्रज

D) फ्रेंच


12) पोर्तुगीजांनी 1503 मध्ये आपली पहिली वखार कोठे स्थापन केली? 

A) सुरत

B) कोचीन

C) मसुलीपट्टणम

D) गोवा


13) भारतातील पहिला पोर्तुगीज गव्हर्नर (1505-09) कोण बनला? 

A) अल्फान्सो-डी-अल्बुकर्क

B) फ्रान्सिस्को डी आल्मिडा 

C) डुप्ले

D) रॉबर्ट क्लाइव्ह


14) भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा खरा संस्थापक कोणाला मानले जाते? 

A) फ्रान्सिस्को डी आल्मिडा

B) अल्फान्सो-डी-अल्बुकर्क 

C) वास्को-द-गामा

D) लॉर्ड कॉर्नवॉलीस


15) अल्फान्सो-डी-अल्बुकर्क याने 1510 मध्ये कोणाकडून गोवा जिंकून घेतले? 

A) झामोरीन

B) आदिलशहा 

C) जहांगीर

D) दुसरा बाजीराव


16) पोर्तुगीजांनी समुद्रात स्वतःचे नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती ओळखपत्र किंवा संरक्षणपत्र व्यवस्था सुरू केली? 

A) लिलाव पद्धत

B) कार्टझ व्यवस्था

C) दुहेरी शासन व्यवस्था

D) ब्लू वॉटर पॉलिसी


17) भारतात पहिली प्रिंटिंग प्रेस आणि तंबाखूची शेती सुरू करण्याचे श्रेय कोणाला जाते? 

A) डच

B) पोर्तुगीज 

C) ब्रिटिश

D) फ्रेंच


18) डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि त्यांनी 1605 मध्ये पहिली वखार कोठे काढली? 

A) 1602, मसुलीपट्टणम 

B) 1600, सुरत

C) 1664, पाँडिचेरी

D) 1616, कोचीन


19) डचांचा पराभव करून त्यांना भारतातून बाहेर काढणारी इंग्रजांमधील लढाई कोणती? 

A) प्लासीची लढाई

B) बक्सारची लढाई

C) बेदेराची लढाई 

D) वाँदीवॉशची लढाई


20) फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1664 मध्ये झाली, त्यांचे मुख्य केंद्र कोणते बनले होते?

A) सुरत

B) पाँडिचेरी 

C) गोवा

D) मद्रास


21) कोणत्या लढाईत फ्रेंच सत्तेचा इंग्रजांकडून पराभव होऊन भारतात फ्रेंच सत्ता समाप्त झाली? 

A) वाँदीवॉशची लढाई 

B) बेदेराची लढाई

C) प्लासीची लढाई

D) बक्सारची लढाई


22) डॅनीश (डेन्मार्क) लोकांनी 1845 पर्यंत आपल्या सर्व वखारी कोणाला विकून टाकल्या? 

A) पोर्तुगीजांना

B) फ्रेंचांना

C) ब्रिटिशांना 

D) डचांना


23) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची (EIC) स्थापना 1600 मध्ये झाली तेव्हा राणी एलिषाबेथने सुरुवातीला किती वर्षांसाठी व्यापाराची सनद दिली होती? 

A) 10 वर्षे

B) 15 वर्षे 

C) 20 वर्षे

D) कायमस्वरूपी


24) 1609 मध्ये मुघल बादशहा जहांगीरच्या दरबारात भेट देणारा पहिला इंग्रज अधिकारी कोण होता? 

A) सर थॉमस रो

B) केंटन हॉकिन्स 

C) रॉबर्ट क्लाइव्ह

D) लॉर्ड कॅनिंग


25) इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला पोर्तुगीजांकडून कोणते बेट हुंडा (आंदण) म्हणून मिळाले होते, जे त्याने कंपनीला भाडेतत्त्वावर दिले? 

A) कोलकाता बेट

B) मुंबई बेट

C) मद्रास बेट

D) गोवा बेट


26) सातानुती, गोविंदपूर आणि कालीकत्ता ही गावे मिळवून कलकत्ता शहराची निर्मिती झाली, तिथे कोणता किल्ला बांधण्यात आला? 

A) फोर्ट सेंट जॉर्ज

B) फोर्ट विल्यम 

C) लाल किल्ला

D) शनिवार वाडा


27) 1765 मधील अलाहाबादच्या तहाद्वारे ब्रिटिश कंपनीला कोणत्या प्रदेशाचे दिवाणी अधिकार (महसूल गोळा करण्याचे अधिकार) मिळाले? 

A) बंगाल, बिहार आणि ओरिसा 

B) मुंबई आणि मद्रास

C) महाराष्ट्र आणि गुजरात

D) पंजाब आणि अवध


28) बंगालमध्ये दुहेरी शासनव्यवस्था (Dual Government) कोणी लागू केली होती? 

A) वॉरन हेस्टिंग्स

B) रॉबर्ट क्लाइव्ह

C) लॉर्ड कॉर्नवॉलीस

D) लॉर्ड डलहौसी


29) बंगालमधील दुहेरी शासनव्यवस्था 1772 मध्ये कोणी रद्द केली आणि महसूल गोळा करण्यासाठी कलेक्टर्सची नेमणूक केली? 

A) रॉबर्ट क्लाइव्ह

B) वॉरन हेस्टिंग्स 

C) लॉर्ड कॉर्नवॉलीस

D) जॉन शोअर


30) 1773 च्या ऐतिहासिक रेगुलेटिंग अॅक्टनुसार (नियामक कायदा) बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? 

A) लॉर्ड विल्यम बेंटिक

B) वॉरन हेस्टिंग्स 

C) लॉर्ड कॅनिंग

D) रॉबर्ट क्लाइव्ह


31) 1773 च्या कायद्यान्वये कलकत्ता येथे स्थापन झालेल्या सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) मुख्य न्यायाधीश कोण होते? 

A) लॉर्ड मेकॉले

B) एलिहाज इम्पे 

C) जॉन शोअर

D) एडमंड बर्क


32) ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील व्यापाराची एकाधिकारशाही कोणत्या चार्टर अॅक्टनुसार संपुष्टात आणून मुक्त व्यापाराला सुरुवात करण्यात आली? 

A) 1793 चा चार्टर अॅक्ट

B) 1813 चा चार्टर अॅक्ट 

C) 1833 चा चार्टर अॅक्ट

D) 1853 चा चार्टर अॅक्ट


33) 1813 च्या चार्टर अॅक्टनुसार भारतातील शिक्षणावर प्रतिवर्षी किती रुपये खर्च करण्याची तरतूद करण्यात आली होती? 

A) 50,000 रुपये

B) 1 लाख रुपये 

C) 10 लाख रुपये

D) 5 लाख रुपये


34) 1784 च्या पिट्स इंडिया अॅक्टनुसार इंग्लंडमध्ये राजकीय व प्रशासकीय कार्यांवर नियंत्रणासाठी स्थापन झालेल्या नियामक मंडळात (Board of Control) किती सदस्य होते? 

A) 4 सदस्य

B) 6 सदस्य 

C) 3 सदस्य

D) 12 सदस्य


35) कोणत्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरलला कौन्सिलचा निर्णय धुडकावून स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेण्याचा विशेष अधिकार देण्यात आला? 

A) 1773 चा रेग्युलेटिंग अॅक्ट

B) 1786 चा कायदा 

C) 1793 चा चार्टर अॅक्ट

D) 1784 च्या पिट्स इंडिया अॅक्ट


36) बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार भारताच्या महसुलातून देण्याची तरतूद कोणत्या कायद्यात करण्यात आली? 

A) 1793 चा चार्टर अॅक्ट

B) 1813 चा चार्टर अॅक्ट

C) 1833 चा चार्टर अॅक्ट

D) 1853 चा चार्टर अॅक्ट


37) कंपनीचा चहा आणि चीनशी असलेला व्यापाराचा एकाधिकारही पूर्णपणे रद्द करून कंपनीचे स्वरूप केवळ प्रशासकीय व राजकीय कोणत्या कायद्याने बनवले? 

A) 1813 चा चार्टर अॅक्ट

B) 1833 चा चार्टर अॅक्ट 

C) 1853 चा चार्टर अॅक्ट

D) 1793 चा चार्टर अॅक्ट


38) 1833 च्या चार्टर अॅक्टनुसार संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? 

A) लॉर्ड कॉर्नवॉलीस

B) लॉर्ड विल्यम बेंटिक

C) लॉर्ड डलहौसी

D) लॉर्ड कॅनिंग


39) गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये पहिला 'कायदा सदस्य' (Law Member) म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? 

A) जॉन शोअर

B) लॉर्ड मेकॉले 

C) विल्यम पीट

D) थॉमस मन्रो


40) कोणत्या सनदी कायद्याने (Charter Act) नागरी सेवांसाठी (Civil Services) अखेर खुली स्पर्धा परीक्षा पद्धत सुरू केली? 

A) 1833 चा चार्टर अॅक्ट

B) 1853 चा चार्टर अॅक्ट

C) 1813 चा चार्टर अॅक्ट

D) 1793 चा चार्टर अॅक्ट


41) 1858 च्या कायद्यान्वये ब्रिटिश राजसत्तेचा थेट प्रतिनिधी म्हणून "भारताचा पहिला व्हाईसरॉय" कोण बनला? 

A) लॉर्ड माउंटबॅटन

B) लॉर्ड कॅनिंग 

C) लॉर्ड विल्यम बेंटिक

D) रॉबर्ट क्लाइव्ह


42) स्वतंत्र भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? 

A) लॉर्ड कॅनिंग आणि वॉरन हेस्टिंग्स

B) लॉर्ड माउंटबॅटन आणि सी. राजगोपालचारी 

C) लॉर्ड स्टॅनले आणि सर विल्यम मेयर

D) यांपैकी नाही


43) वॉरन हेस्टिंग्सने महसूल गोळा करण्यासाठी कोणती पद्धत सुरू केली होती, जी पुढे अपयशी ठरली? 

A) कायमधारा पद्धत

B) लिलाव पद्धत 

C) रयतवारी व्यवस्था

D) महालवारी पद्धत


44) लॉर्ड कॉर्नवॉलीसने 22 मार्च 1793 रोजी बंगाल, बिहार आणि ओरिसामध्ये कोणती जमीन महसूल पद्धत कायमस्वरूपी लागू केली? 

A) रयतवारी व्यवस्था

B) कायमधारा पद्धत 

C) महालवारी पद्धत

D) मक्ता पद्धत


45) थॉमस मन्रो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड हे कोणत्या जमीन महसूल पद्धतीचे जनक मानले जातात? 

A) कायमधारा पद्धत

B) रयतवारी व्यवस्था 

C) महालवारी पद्धत

D) पंचवार्षिक बंदोबस्त


46) रयतवारी व्यवस्था ब्रिटिशांच्या ताब्यातील सर्वाधिक किती टक्के भूभागावर (मुंबई, मद्रास, आसाम) लागू करण्यात आली होती? 

A) 19% भूभाग

B) 51% भूभाग

C) 30% भूभाग

D) 45% भूभाग


47) वैयक्तिक शेतकऱ्याशी करार न करता संपूर्ण खेड्याशी किंवा गावाशी (महाल) संयुक्त करार करणारी पद्धत कोणती? 

A) रयतवारी व्यवस्था

B) महालवारी पद्धत 

C) कायमधारा पद्धत

D) मौजेवार पद्धत


48) ब्रिटिश राजकीय अर्थतज्ज्ञ डेव्हिड रिकार्डो यांच्या कोणत्या सिद्धांताचा प्रभाव ब्रिटिश महसूल अधिकाऱ्यांवर होता? 

A) लोकसंख्या सिद्धांत

B) भाडे सिद्धांत (Rent Theory) 

C) मुक्त व्यापार सिद्धांत

D) दुहेरी नियंत्रण सिद्धांत


49) दुसऱ्या बाजीरावाच्या काळात 1796 मध्ये सुरू केलेल्या लिलाव पद्धतीवर (मक्ता पद्धत) मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एलफिन्स्टन याने कोणत्या अहवालात कडक टीका केली ? 

A) पेशव्यांकडून जिंकलेल्या प्रदेशांवरील अहवाल

B) वसाहत कायदा (Act of Settlement)

C) सहारनपूर नियम अहवाल

D) मेकॉले समिती अहवाल


50) रयतवारी शोषणाविरुद्ध 1875 मध्ये पुणे व अहमदनगर परिसरात झालेल्या 'दख्खनच्या दंग्यांचे' (खतफोडीचे बंड) नेतृत्व कोणी केले होते ? 

A) रॉबर्ट प्रिंगेल आणि विनगेट

B) ग. वा. जोशी (सार्वजनिक काका) आणि महात्मा ज्योतिराव फुले

C) न्यायमूर्ती रानडे आणि नाना फडणवीस

D) त्र्यंबक डेंगळे आणि सदाशिव माणकेश्वर


टेस्ट इथे खाली दिलेल्या बॉक्स मध्ये सोड़वायची आहे. 





No comments

Powered by Blogger.